खालापूरमध्ये दरडीच्या छायेत जीव मुठीत घेऊन राहणारे लोक काय सांगतात?

व्हीडिओ कॅप्शन, ‘डोंगराला भेगा...आमचा जीव घेतील सांगता येत नाही’
खालापूरमध्ये दरडीच्या छायेत जीव मुठीत घेऊन राहणारे लोक काय सांगतात?
Published

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात 19 गावं दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित झालेली आहेत. त्यातील दोन गावांची तर धोकादायक म्हणून नोंद झालेली आहे.

पण त्यांचं कायमस्वरुपी पुनर्वसन अजूनही झालेलं नाही. सुभाषनगर या अंदाजे 1500 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये रहिवासी जीव मुठीत धरुन राहात आहेत.

रिपोर्ट- अल्पेश करकरे

शूट- शार्दुल कदम

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)